Monday, April 7, 2025
spot_img

काय ! मुलींना वडिलांच्या मालमत्तेत हक्क नाही का? जाणून घ्या उच्च न्यायालयाचा निर्णय!

आजकाल वारसा हक्काच्या (inheritance laws) संदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय येत आहेत. नुकत्याच Mumbai High Court ने दिलेल्या एका निर्णयाने असे स्पष्ट केले आहे की, काही विशिष्ट परिस्थितींमध्ये मुलींना वडिलांच्या property वर हक्क (legal rights) नाही. पण हा निर्णय सगळ्या  परिस्थितीत लागू होत नाही. चला, याविषयी सविस्तर माहिती समजून घेऊया.

1956 पूर्वीचा वारसा कायदा (Old Inheritance Law) –  (Click करा)

जर वडिलांचा मृत्यू 1956 पूर्वी झाला असेल, तर त्या काळच्या Hindu Succession Law नुसार मुलींना वारसा हक्क मिळत नसे.

उदाहरणार्थ, जर तुमचे आजोबा 1955 साली वारले असतील, तर त्यांच्या land or property वर केवळ त्यांच्या मुलांनाच हक्क होता. त्या काळात सामाजिक व्यवस्थेमुळे महिलांना property rights मिळणे कठीण होते.

1956 नंतरचा कायदा  – (Click करा)

Hindu Succession Act, 1956 नंतर मुलींना वडिलांच्या संपत्तीत हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. जर वडिलांनी मृत्यूपूर्वी will (मृत्युपत्र) तयार केले नसेल, तर मुलं आणि मुली दोघेही समान हक्काने मालमत्तेचा वारसा हक्क (Property Inheritance) घेवू शकतात.

उदाहरण:
जर तुमच्या वडिलांचा मृत्यू 1960 साली झाला असेल आणि त्यांनी will तयार केली नसेल, तर तुमची बहिण देखील त्या property वर तेवढाच हक्क सांगू शकते.

2005 चा सुधारित कायदा- (Click करा)

Hindu Succession (Amendment) Act, 2005 नुसार विवाहित मुलींनाही वडिलांच्या संपत्तीत equal rights मिळण्याचा अधिकार आहे. मग ती संपत्ती agricultural land, घर किंवा अन्य स्वरूपाची असो.

उदाहरण:
सातारा जिल्ह्यातील सीता नावाच्या महिलेने 2006 साली कोर्टाच्या माध्यमातून वडिलांच्या शेतीवर आपला हक्क मिळवला.

Will (मृत्यूपत्र) संदर्भातील महत्त्वाची माहिती – (Click करा)

जर वडिलांनी मृत्यूपूर्वी will तयार केली असेल, तर त्या मृत्युपत्रानुसार property division होईल.

उदाहरणार्थ:
जर कोल्हापूरच्या एका शेतकऱ्याने संपत्ती केवळ मुलाला देण्याचा उल्लेख will मध्ये केला असेल, तर ती legally valid मानली जाईल, आणि मुलीला त्या संपत्तीवर legal claim करता येणार नाही.
सुधारित कायदा समजून घेण्यासाठी आपण आपल्या रोज आजूबाजूला घडणाऱ्या घटना यांची उदाहरणे पाहुयात जेणेकरून आपल्याला सुधारित कायद्यांमध्ये काय बदल आहेत हे समजण्यास मदत होईल.

1. Sangli Case (1954): रामभाऊंच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलगी सुमनला त्यांच्या land वर कोणताही हक्क मिळाला नाही, कारण तेव्हाचा वारसा हक्क कायदा वेगळा होता.

2. Ratnagiri Case (2006): गीता नावाच्या महिलेला कोर्टाच्या माध्यमातून तिच्या वडिलांच्या शेतीत ownership मिळाली.

तुमचा वारसा हक्क मिळवण्यासाठी काय करता येईल?Steps to Follow (Click करा)

1. वडिलांच्या संपत्तीशी संबंधित सर्व documents तयार ठेवा.

2. अनुभवी lawyer कडून legal advice घ्या.

3. जर वडिलांनी will तयार केली नसेल, तर कोर्टाच्या माध्यमातून legal action घ्या.

समाजात अजूनही लग्न झालेल्या मुलींना वडिलांच्या संपत्तीवर हक्क सांगण्यास प्रोत्साहन दिले जात नाही. पण वडिलांच्या property वर हक्क मिळवणे ही केवळ कायदेशीर बाब नाही, तर equality आणि justice चा भाग आहे.

शेवटी मनाला भावणारा एक विचार

लग्न होवून सासरी गेलेली मुलगी जेव्हा कधी हक्काने 4 दिवस माहेरपणाला येते तेव्हा तिचे आई वडील आहेत तोपर्यंतच तिचे माहेरपण!!अशी जी समाजाची मानसिकता आहे ती बदलण्याची गरज आहे.

आई वडील नाहीत म्हणून भावाने आपल्या बहिणीला आई वडिलांची उणीव भासू देवू नये ही प्रत्येक भावाची जबाबदारी असते.लग्न करून सासरी गेलेल्या मुलीला वारसा हक्कातील मालमत्तेपेक्षा भावाकडून मिळणारा आधार, प्रेम,जिव्हाळा याची जास्त गरज असते.असं निखळ प्रेम,असा समजूतदारपणा भाऊ बहिणीच्या नात्यांमध्ये असेल तर,वाद न होता समजुतीने गोष्टी हाताळल्या तर वारसा हक्का वरून भावा-भावा मध्ये,तसेच भाऊ- बहीनीमध्ये होणारा क्लेश टाळता येवू शकतो.

मुलींना वडिलांच्या संपत्तीत हक्क मिळायला हवा की नाही?या बद्दल प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते कारण माणसे तितक्या प्रकृती असतात.

गावात किंवा कुटुंबात याबाबत कसा विचार केला जातो? तुमचे विचार marathipride.com या साईट वर कळवा. आणि या ब्लॉगला तुमच्या मित्र-मैत्रिणींशी शेअर करा.अशा नवनवीन माहितीसाठी आमचा what’s app ग्रूप जॉईन करा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Posts

spot_imgspot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.